संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी हा दावा केला आहे की काँग्रेसही काही वर्षांमध्ये लुप्त होऊन जाईल. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी सुरु आहे त्याची तुलना बिग बॉसच्या घरात होणाऱ्या भांडणांशी केली आहे. बिग बॉसच्या घरात जशी भांडणं होतात त्याच प्रकारे काँग्रेसचे नेते रोज एकमेकांवर आरोप आणि एकमेकांचे कपडे फाडत आहेत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं आहे?

राजनाथ सिंह म्हणाले, काँग्रेसचे लोक जवळपास रोज पक्ष सोडत आहेत. एकापाठोपाठ लोक काँग्रेस पक्ष सोडत आहेत. भाजपात येत आहेत, त्यामुळे मला वाटतं आहे की काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे नामशेष होऊन जाईल असं मला वाटतं. पौडी या लोकसभा मतदारसंघातून अनिल बलूनी लढत आहेत. त्यांच्या प्रचारसभेत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

Rohit Pawar Nitin Gadkari
रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
Kailash Vijayvargiya on civil war
Kailash Vijayvargiya: ‘३० वर्षांनंतर गृहयुद्ध होणार’, भाजपा मंत्र्यांचे विधान; काँग्रेस पलटवार करताना म्हणाले, ‘मग महसत्ता कसं होणार?’
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
eknath shinde and ajit pawar 4
स्वाक्षरीवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये धुसफूस
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर

हे पण वाचा- “राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

२०२४ नंतर मुलं असही विचारु शकतील की काँग्रेस म्हणजे काय?

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीनंतर काही वर्षांनी मुलांना काँग्रेस म्हणजे काय? हे विचारतील. काँग्रेस नेते एक-दुसऱ्याशी रोज भांडत आहेत. टेलिव्हिजनवर बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे ते लोक भांडत असतात. रोज एकमेकांशी काँग्रेसचे नेते तसंच वागत आहेत. तसंच एकमेकांचे कपडे फाडत आहेत.” असं राजनाथ सिंह म्हणाले.

गढवालमध्ये ४५ टक्के ठाकूर, ३० टक्के ब्राह्मण, १८ टक्के अनुसूचित जातीचे मतदार आहेत. पौडी गढवाल भौगोलिक स्थिती रामनगर, श्रीनगर, कोटद्वार या ही ठिकाणं वगळता मोठा भाग हिस्सा ग्रामीण आहे. त्यामुळे ही सीट महत्त्वाची मानली जाते आहे.