संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी हा दावा केला आहे की काँग्रेसही काही वर्षांमध्ये लुप्त होऊन जाईल. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी सुरु आहे त्याची तुलना बिग बॉसच्या घरात होणाऱ्या भांडणांशी केली आहे. बिग बॉसच्या घरात जशी भांडणं होतात त्याच प्रकारे काँग्रेसचे नेते रोज एकमेकांवर आरोप आणि एकमेकांचे कपडे फाडत आहेत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं आहे?

राजनाथ सिंह म्हणाले, काँग्रेसचे लोक जवळपास रोज पक्ष सोडत आहेत. एकापाठोपाठ लोक काँग्रेस पक्ष सोडत आहेत. भाजपात येत आहेत, त्यामुळे मला वाटतं आहे की काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे नामशेष होऊन जाईल असं मला वाटतं. पौडी या लोकसभा मतदारसंघातून अनिल बलूनी लढत आहेत. त्यांच्या प्रचारसभेत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हे पण वाचा- “राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

२०२४ नंतर मुलं असही विचारु शकतील की काँग्रेस म्हणजे काय?

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीनंतर काही वर्षांनी मुलांना काँग्रेस म्हणजे काय? हे विचारतील. काँग्रेस नेते एक-दुसऱ्याशी रोज भांडत आहेत. टेलिव्हिजनवर बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे ते लोक भांडत असतात. रोज एकमेकांशी काँग्रेसचे नेते तसंच वागत आहेत. तसंच एकमेकांचे कपडे फाडत आहेत.” असं राजनाथ सिंह म्हणाले.

गढवालमध्ये ४५ टक्के ठाकूर, ३० टक्के ब्राह्मण, १८ टक्के अनुसूचित जातीचे मतदार आहेत. पौडी गढवाल भौगोलिक स्थिती रामनगर, श्रीनगर, कोटद्वार या ही ठिकाणं वगळता मोठा भाग हिस्सा ग्रामीण आहे. त्यामुळे ही सीट महत्त्वाची मानली जाते आहे.