लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरात सुरु आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात सामना होणार आहे. आज अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची अलिबागमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीश्वरांना ४ जूनला महाराष्ट्राचा वाघ आला हे कळले पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सगळीकडे फिरत आहेत. मी मुख्यमंत्री असताना दोन चक्रीवादळे आपल्याकडे येऊन धडकली होती. त्या चक्रीवादळाचा आपण सामना केला. त्यामुळे त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे या फडफडणाऱ्या पंख्यांचा सामना करतील. ती दोन चक्रीवादळे होती. आताही दोन चक्रीवादळे आहेत. महाराष्ट्रावर आदळणारे हे दोन वक्री वादळं असून रायगडकर या वक्री वादळाचा सामना केल्याशिवाय राहणार नाहीत”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केला.

kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..
Maharashtra Navnirman Sena workers attacked Uddhav Thackeray convoy in Thane
ठाण्यात उद्धव यांच्यावरील मनसे हल्ल्याला कोणाचे छुपे समर्थन?
dhav Thackeray, Thane, MNS, Uddhav Thackeray s Convoy Attacked by MNS , convoy attack, Shiv Sena, Rajan Vichare, Kedar Dighe, political clash, thane news,
मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले? ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक”, संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मर्द असाल तर…”

हेही वाचा : “अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही”; शरद पवारांचा इशारा कुणाला?

“आता लोकसभेच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने निघायला लागल्या आहेत. निवडणुकीचे टप्पे करत असताना आपल्याला ते फुलटॉस देत आहेत. सध्या आयपीएल सुरु आहे. आयपीएल पाहत असताना खेळाडू नेमके कोठून खेळतात हे कळत नाही. हा खेळाडू मुंबईचा होता, तो तर दिल्लीकडून खेळतो. हा खेळाडू दिल्लीचा होता, तो आता हैदराबादकडून खेळतो. बोली लावून सर्व खेळतात. पण तो खेळ आहे. आता खेळासारख्या बोल्या राजकारणात लागायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता, तो तिकडे गेला. भाजपाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण म्हणतो शूरा मी वंदिले आणि भाजपा काय म्हणते? तर चोरा मी वंदिले, म्हणजे चोरी कर मी तुझे वंदन करतो. भाजपावर अशी वेळ का आली? जर दहा वर्षात कामे केली असती तर ही फोडाफोडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आपल्या महाराष्ट्रात खेट्या घालत आहेत. शिवसेना बरोबर होती, त्यावेळी आपण त्यांना भरभरुन दिले. त्यावेळी मोदींना एवढ्या सभा महाराष्ट्रात घेण्याची गरज पडली नाही. मात्र, आता प्रत्येक गल्लीत ते फिरत आहेत. ४० पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्राने दिले होते. एवढे करुनही तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. आता ते आफवा पसरवत आहेत. मध्येच त्यांना माझ्याबद्दल प्रेम आलं आणि ते म्हणाले, उद्धव ठाकरेंवर संकट आल्यावर धावून जाईल, आता संकट आणून तर पाहा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.