पंजाबमध्ये मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच तिथल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. यासाठी मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला असून त्या वेळी जर फक्त ६ किलोमीटर पुढे भारतीय सैन्य गेलं असतं, तर गुरूनानक देव यांची तपोभूमी भारतात राहिली असती, असं देखील मोदी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

पहिली घटना…देशाची फाळणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशाची फाळणी, १९६५चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१चं बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा उल्लेख केला आहे. “जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा काँग्रेसचे लोक होते. यांना एवढंही समजलं नाही की सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला (लाहोर) भारतात घेतलं जावं. काँग्रेसच्या लोकांनी पाप केलं आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
Delhi HC directs reconstitution of IOA ad-hoc panel for wrestling
भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती; बजरंग, विनेश, साक्षी, सत्यवर्तच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय
Thailand Prime Minister Shretha Thavisin removed for ethics violations
थायलंडच्या पंतप्रधानांना पदावरून हटवले; नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Gadchiroli, Dharmarao Baba Atram, Ajit Pawar, Sharad Pawar, Chief Minister, Maharashtra Politics, Nationalist Congress Party, mahayuti, Vidarbha, Election Strategy,
“महायुतीची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री,” कुणी केला हा दावा?

दुसरी घटना…६५चं युद्ध!

मोदींनी दुसरी घटना १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळची दिली आहे. “१९६५च्या लढाईमध्ये भारतीय सेना लाहोरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या इराद्यानेच पुढे निघाली होती. जर तेव्हा दोन पावलं पुढे गेले असते, तरी गुरुनानक देवजींची तपोभूमि आपल्याकडे असती. दुसरी संधी देखील काँग्रेसनं गमावली”, असं मोदींनी सांगितलं.

तिसरी घटना…बांगलादेश युद्ध!

दरम्यान, तिसरी घटना १९७१ साली झालेल्या बांगलादेश युद्धामधली मोदींनी सांगितली. “बांगलादेशच्या युद्धात ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा दिल्लीत बसलेल्या सरकारमध्ये दम असता, तर ते म्हणाले असते की हे सैनिक तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा आम्हाला गुरुनानक देवजींची तपोभूमि परत मिळेल. तीन-तीन संधी काँग्रेस सरकारनं गमावल्या”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावर देखील निशाणा साधला आहे. “एकानं पंजाबला लुटलं, दुसरा दिल्लीत एकापाठोपाठ एक घोटाळे करत आहे. एकाच माळेचे मणी असूनही आता हे दोन्ही पक्ष पंजाबमध्ये एकमेकांविरोधात असल्याचं नाटक करत आहेत. पण खरं तर हे आहे की काँग्रेस जर ओरिजिनल पक्ष आहे, तर दुसरा त्याची फोटोकॉपी आहे”, असं मोदी म्हणाले.

पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी इतर चार राज्यांसोबतच पंजाबमध्ये देखील मतमोजणी होणार आहे.