आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. सध्या प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी असली तर डिजीटल माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष आपापला प्रचार पूर्ण ताकदीनं करत आहेत. २२ जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाने सर्व प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी घातलेली असली तरी ऑनलाइन माध्यमातून प्रचार करण्याला परवानगी दिली आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ वाराणसी इथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याला नैसर्गिक शेतीवर भर देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन द्यायला हवं. आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी जोडून घ्यायला हवं. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. लोकांना मतदानाचं महत्त्व समजावून सांगायला हवं.

naseem khan letter to congress
काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांनी मोठा आरोप करत प्रचाराला दिला नकार
Sanjay Raut slams modi on mangalsutra jibe
“प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठा गटाची मोदींवर टीका
What Sharad Pawar Said About Modi?
शरद पवारांचं सांगोल्यात वक्तव्य, “नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक, कारण…”
What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”

उत्तरप्रदेशासोबतच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांसोबतचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच राजकीय कार्यक्रम होता. निवडणूक आयोगाने करोनाच्या पार्श्वभूमीवर रोड शो, प्रचारसभा, रॅली यांच्यावर २२ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. २२ जानेवारीनंतर करोनाची परिस्थिती पाहून निवडणूक आयोग ही बंदी हटवायची की पुढे तशीच ठेवायची याविषयी निर्णय घेणार असल्याचं झी न्यूजचं म्हणणं आहे.