निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये, ९० टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे तर ५२ टक्क्यांहून अधिक लोकांना दोन्ही डोस मिळाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांचा भाजपाप्रती असलेला राग आता कमी झाला आहे की नाही हे या निवडणुकांचे निकाल सांगतील. उत्तर प्रदेश आणि पंजाब वगळता उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. २०१७ मध्ये मणिपूर आणि गोव्यात काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण सत्ता भाजपाला मिळाली. सर्वात मनोरंजक लढत उत्तर प्रदेशमध्ये आहे, जिथे काँग्रेस आणि बसपा अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. पंजाबमध्ये मात्र काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांच्यात तिरंगी लढत आहे. येथे अकाली दलापासून फारकत घेत भाजपाने प्रथमच रिंगणात प्रवेश केला आहे.

“डिजिटल प्रचारात भाजपाशी स्पर्धा करू शकत नाही, निवडणूक आयोगाने मदत करावी”; अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे निवडणूक निकाल देशाच्या राजकारणातील तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. पहिला प्रश्न म्हणजे कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला आहे का आणि दुसरा, द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण होईल का? याशिवाय करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि वाढलेली महागाई हे निवडणुकीचे मुद्दे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तरही निवडणूक निकालात सापडेल. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या ११० जागांवर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. इथे राकेश टिकैतही एक चेहरा म्हणून समोर आला आहे. ते कोणाला पाठिंबा देणार आणि भाजपाची इथं काय स्थिती असेल हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राकेश टिकैत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असला, तरी त्यांचा विशिष्ट पक्षाला पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात या भागात २०१७ मध्ये भाजपाने ८० जागा जिंकल्या होत्या. हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र देखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या संगनमताने मतांच्या धर्तीवर शेतकरी आंदोलनामुळे जाटांच्या संतापाचा काय परिणाम होतो. हे देखील पाहण्यासारखे असेल.