दरवर्षी आपण मोठ्या आतुरतेनं गणेशोत्सवाची वाट पाहत असतो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घराघरांत लाडक्या बाप्पाचं आगमन होतं. गणपतीच्या आगमनानं साऱ्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या या बाप्पाची जो तो आपापल्यापरिनं दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवस सेवा करतो.

बहुतेक घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. तर अनेकांकडे पाच किंवा सात दिवस बाप्पा मुक्कामाला असतो. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यात तर केवळ एका दिवसासाठी बाप्पांचं आगमन होतं. सकाळी गणपतीचे आवाहन करून संध्याकाळी विसर्जन केले जाते. यामागच्या परंपरा वेगळ्या आहेत.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करण्यामागे काही ठोस असे संदर्भ नाहीत. लोक आपल्या आनंद आणि समाधानासाठी बाप्पाची पाच दिवस मनोभावे सेवा करतात. चतुर्थीच्या सणाला नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. वर्षभर दुरावलेलं कुटुंब या निमित्तानं जवळ येतं. तेव्हा हा आनंद अधिक द्विगुणित व्हावा, सारं कुटुंब त्याच्या निमित्तानं एकत्र यावं या उद्देशानं अनेक कुटुंबांनी मूर्ती विसर्जनाचे दिवस वाढवले. आणि अशाप्रकारे दीडवरुन पाच, सात दिवस गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला.

जसं गोव्यात किंवा दक्षिणेकडे दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे तशी सांगलीमध्ये पाच दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन राजे पटवर्धन सरकार पाच दिवसांनी राजवाड्यातील गणेश मूर्तीचं विसर्जन करायचे. तेव्हा राजाचे अनुकरण करत प्रजेने देखील पाच दिवसांनंतर मूर्ती विसर्जन करण्याची परंपरा सुरू केली.