आयुर्वेदाची चिकित्सा असे सांगते की, थंडीमुळे शरीरातील वायू वाढतो. त्याला स्निग्धता कमी पडल्याने तो त्वचेला भेगा पाडतो. त्यामुळेच ओठ आणि पायांना भेगा पडतात.उपाय काय?ओठाला किंवा पायाच्या भेगांना एरंडीचे तेल (एरंडेल) किंवा साजूक तूप लावावे. लहान मुलांना दुधावरची सायसुद्धा लावता येते. (एरंडेल खाण्यासाठी वापरले जाणारेच घ्यावे. ते औषधांच्या दुकानात मिळते.)यामुळे काय होते?असे केल्याने शरीराला बाहेरून स्निग्धता मिळते. त्याचा चांगला परिणाम होतो.इतर काय काळजी घ्यावी?* पनीर, मांसाहार यासारखे जड पदार्थ, डाळीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. विशेषत: रात्रीच्या वेळी टाळावेत.* आहारात साजूक तूप, दुधाचा समावेश असावा.* स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि शरीरात ऊब निर्माण होईल असे व्यायाम करावेत.