India vs South Africa, T20 Series: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे, जिथे रविवार १० डिसेंबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. राहुल द्रविडने पुन्हा एकदा पदभार स्वीकारला असून, प्रशिक्षका पदाच्या करारातील मुदतवाढीनंतरची ही त्याची पहिली मालिका आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव या संघाचा कर्णधार आहे. या मालिकेबाबत द्रविडने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांचा दृष्टिकोन कसा असेल, यावर टीम इंडियाची योजना सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल द्रविडचा असा विश्वास आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे कठीण आहे. प्रत्येक भारतीय फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी एक गेम प्लॅन असावा अशी त्याची इच्छा आहे. यावर त्याने सविस्तरपणे त्याचे मत मांडले आहे. टी-२० मालिकेसाठी निवड झालेला संघ हा नवखा असून त्यांना येथील खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय नाही.

हेही वाचा: AUS vs PAK: पाकविरुद्धच्या मालिकेनंतर स्मिथ वॉर्नरप्रमाणे कसोटीतून निवृत्त होणार का? ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापकाचे मोठे विधान

टी-२० मालिकेआधी राहुल द्रविड काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करावा, याचा सराव करत आहोत. फलंदाजी करण्यासाठी आफ्रिकेतील खेळपट्ट्या या आव्हानात्मक आहेत. याविषयीचे आकडे तुम्हाला माहित असतीलच. इथे फलंदाजी करणे खूप कठीण आहे. खासकरून सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग ही ठिकाणी चेंडू अधिक उसळी घेतो, त्यांच्या खेळपट्टीत सतत बदल होत राहतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाकडे आपली एक योजना असेल की, त्यांना कशाप्रकारे पुढे जायचे आहे.”

स्टार स्पोर्ट्सवरील या दौऱ्याबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, “आफ्रिका खंडात खेळण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरता जास्त महत्त्वाची आहे.” तो पुढे म्हणाला, “आम्ही प्रत्येका खेळाडूकडून एकसारखे खेळण्याची अपेक्षा करत नाहीत. आमची इच्छा आहे की, त्यांनी येथील परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मग आपल्यात बदल करावे. खेळाडू जेव्हा मैदानात पोहोचतात, तेव्हा हे अधिक मानसिक कणखर असणे आवश्यक आहे. मला वाटते की, तुम्हालाही माहितीये, आपण जे प्रयत्न करतो ते फक्त योग्य दिशेने जात आहेत की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर भर देणे गरजेचे आहे. जर आपण चांगली खेळी करत पुढे गेलो तर त्यांनी सामना जिंकून देण्यात योगदान द्यावे.”

हेही वाचा: IND vs PAK: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुन्हा एकदा भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या केव्हा, कुठे,कसा पाहाल सामना?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला. अलीकडेच बीसीसीआयने त्याच्या कराराची मुदत वाढवण्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, राहुल द्रविडचा हा कार्यकाळ किती काळ असेल, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असेल, असे मानले जात आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेत होणारी टी-२० मालिका अनेक युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार असून, त्यात प्रभावी खेळ दाखवून ते संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid revealed every batsman has a game plan to face sa bowlers avw
Show comments