महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाकडून चांगल्या खेळीची आणि विश्वचषक जिंकण्याची आशा होती. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील निराशाजनक कामगिरीचा भारतीय महिला क्रिकेट संघाला फटका बसला. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मराठमोठ्या स्मृती मानधनाने दिमाखदार फलंदाजी करत ८४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिताली राजनेही चांगला खेळ करत ८४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या जोरावर ६८ धावा केल्या. परंतु तरीही संघाला पराभव पत्करावा लागला.

‘त्या’ नो बॉलने केला घात, भारताचा पराभव, टीम इंडिया महिला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

eye on suryakumar yadav shreyas iyer in buchi babu tournament
बुची बाबू स्पर्धेत सूर्यकुमार, श्रेयसकडे नजर; मुंबई-तमिळनाडू एकादश सामना आजपासून
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…
Vidarbha cricket team, Ranji tournament, player exits, player exits from vidarbha cricket team, Aditya Sarwate, Mohit Kale, Rajneesh Gurbani,
विदर्भ क्रिकेट संघाला गळती, नेमके कारण काय?
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
Mohammed Shami Likely To Play Ranji Trophy Match From Bengal on 11 October
Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची तारीख ठरली! १० महिन्यांनंतर ‘या’ स्पर्धेत खेळणार पहिला सामना
Former cricketer Ricky Ponting opinion on the Border Gavaskar trophy sport news
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचे मत
Rohit Sharma and Virat Kohli likely to Play in Duleep Trophy
Rohit-Virat: रोहित शर्मा-विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमधील ‘ही’ स्पर्धा खेळणार, कसोटी मालिकेच्या तयारीसाठी BCCI चा खास प्लॅन

दरम्यान, ही विश्वचषक स्पर्धा कर्णधार मिताली राजची शेवटची स्पर्धा असू शकते, अशा चर्चा सुरू होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मितालीला विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर ती निवृत्त होणार आहे का?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मिताली म्हणाली की, “मी भविष्याबद्दल फारसं नियोजन केलेलं नाही. एखाद्या स्पर्धेसाठी खेळाडूंनी वर्षभर खूप मेहनत घेतली असेल आणि जेव्हा विश्वचषकातून आम्ही अशाप्रकारे बाहेर पडतो, ही बाब खूप निराशाजनक असते. त्यामुळे ही हार स्वीकारायला आणि पचवायला आम्हाला वेळ लागतो. परंतु खेळाडूंनी ही हार स्वीकारावी आणि नंतर प्रत्येक खेळाडूसाठी पुढच्या ज्या स्पर्धा असतील, त्याची तयारी करावी,” असं उत्तर तिने दिलं. मात्र, स्वतःच्या निवृत्तीच्या चर्चांबद्दल तिने स्पष्टता केली नाही.

‘तुला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहण्याची ही शेवटची वेळ आहे का,’ असं विचारलं असता ती म्हणाली “आम्ही ज्या प्रकारे खेळलो, त्यावरून आधी म्हटल्याप्रमाणे मी यावर काहीही भाष्य करणे माझ्यासाठी योग्य होणार नाही. त्यामुळे मी त्याबद्दल काही स्पष्ट बोलण्यापूर्वी आम्ही ही हार स्वीकारून ती पचवणं आवश्यक आहे,” असं तिने सांगितलं.