शहीद दिवस भारतात अनेक तारखांना साजरा केला जातो. २३ मार्च हा दिवस या कारणांमुळे स्मरणात आहे, कारण या दिवशी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तीन शूर स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी फाशी दिली. तसेच ३० जानेवारी हा दिवस महात्मा गांधीं यांच्या स्मरणार्थ शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

शहीद दिवस का साजरा केला जातो?

भारतात मुख्यतः या दोन तारखांना शहीद दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता फाशी दिली होती. असे ही सांगितले जाते की फाशीवर जाताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आनंदाने – ”मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला’ हे गाणे गात होते. वयाच्या २३ व्या वर्षी फासावर चढलेले भगतसिंग पुढे देशाचे आदर्श बनले. ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी भारतीयांची स्वातंत्र्याची चळवळ त्यांच्या फाशीने अधिक तीव्र झाली.

rahul gandhi jiu jitsu aikido
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
shinde group former mayor arvind walekar challenge ambernath mla dr balaji kinikar
लोणी खाणाऱ्याची हंडी दोन महिन्यांनी फोडणार; शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
Political message on Govinda t shirt Mumbai news
गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Haji Sarwar, murder, Chandrapur, Digras,
चंद्रपूर : ‘या’ कारणातून हाजी सरवरची हत्या; नागपूर, दिग्रसमध्ये शिजला कट
kolkata Murder and rape case
Kolkata Rape Case : “पालक असल्याच्या नात्याने…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांनी दिला राजीनामा; म्हणाले, “माझी बदनामी…”
Started farming during the Corona period Earn lakhs of rupees per month
Success Story: दिल्लीतील भाजीविक्रेत्याने करोना काळात गावी जाऊन सुरू केली शेती; महिन्याला कमावतो लाखो रुपये

शहीद दिवसांचा इतिहास

भगतसिंग यांनी राजगुरू यांच्यासमवेत १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ब्रिटीश अधिकारी जे.जे. पी. सँडर्स यांना मारले. सुखदेव हेदेखील या योजनेत सामील होते. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना या कृतीत मदत केली. याशिवाय ब्रिटिश सरकारला जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी क्रांतिकारक साथीदार बटुकेश्वर दत्त यांच्यासमवेत ८ एप्रिल १९२९ रोजी इंग्रज सरकारला जागं करण्यासाठी बॉम्ब आणि पत्रके फेकली. या घटनेनंतर दोघांना तिथे अटक करण्यात आली होती.

तुरुंगात सुमारे २ वर्षांच्या काळात भगतसिंग क्रांतिकारक कारवायांशीही संबंधित होते , तसेच यात त्यांनी त्यांचे लेखन व अभ्यासही सुरू ठेवला होता. असे म्हणतात की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी २४ मार्चच्या दिवशी निश्चित करण्यात आली होती, परंतु आदल्या दिवशी म्हणजेच २३ मार्चच्या रात्री या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली .त्यानंतर ही बातमी सर्वत्र आगीसारखी पसरली. जनतेचा संताप आणि निषेध पाहून ब्रिटीश सरकारने फाशी देण्याचा दिवस आणि वेळ बदलली आणि भारताच्या या क्रांतिकारांना एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली.

शहीद दिवसाचे महत्त्व

शहीद दिवस दरवर्षी २३ मार्च रोजी भारतातील नागरिकांद्वारे साजरा केला जातो. भारतातील शहीद दिन हा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणाचा दिवस आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या स्मरणार्थ अगदी लहान वयात आपल्या प्राणांची आहुती दिली. शहीद दिवस साजरा करण्यासाठी कोणतीही अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नसली तरीही देशभरातील अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि इतर संस्था शहीद दिवस साजरा करतात. अनेक शाळांमध्ये, शहीद दिन हा वादविवाद आणि निबंध लेखन स्पर्धा म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये देशभक्तीचा विषय असतो.