अलिबाग : रायगड जिल्ह्य़ातील मुरुड सुमुद्र किनाऱ्यावर दोन संशयित परदेशी बोटी आढळून आल्या . या बोटीना भारतीय सागरी हद्दीतून बाहेर काढण्यात आले असले तरी यामुळे सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या आठवडय़ात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दोन बोटी संशयास्पदरीत्या आढळून आल्या. अरबी समुद्रातील कासा किल्यापासून सुमारे एक मल अंतरावर दोन बोटी असल्याचे गस्ती पथकाच्या लक्षात आले. जवान ८ आणि जवान ९अशी या परदेशी बोटीची नावे आहेत.