राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रकरणी निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं आज (६ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. या निकालानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने लावलेला निकाल विनम्रपणे स्वीकारत असल्याचं अजित पवार म्हणाले.

“गेल्या वर्षी राजकीय घडामोडी राज्यात घडल्या. कोणत्याही पक्षासंदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची परंपरा आहे. त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यामध्ये आम्हीही आमचं म्हणणं मांडलं, इतरांनीही त्यांचं म्हणणं मांडलं. त्यावर अनेक तारखा पडल्या. सगळ्या वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ, झेंडा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा आत्रम, आदिती तटकरे यांच्याह ५० आमदारांनी घेतलेल्या निर्णयावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. हा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो. आम्ही निवडणूक आयोगाचेही आभार मानतो”, असं अजित पवार म्हणाले.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
Supriya Sule criticizes Ajit Pawar over Chief Minister Ladki Bahin Yojana
कोणतीच बहीण लाडकी नसल्याचा अधिक अनुभव! सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार लक्ष्य
jitendra awhad on uddhav thackeray
Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही मराठीच आहोत. त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही जास्त टीका टिप्पणी करत नाहीत. काम करणारी माणसं आहोत आम्ही. केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रात आणणे. महाराष्ट्रात विकासाच्या करत प्रयत्नशील राहणे एवढं आमचं काम आहे.”