बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री परिसरात शुक्रवारी पहाटे १७ चंदन तस्करांची टोळी गजाआड केली. यावेळी पोलिसांनी तस्करांकडून ३२८ किलो चंदनाच्या लाकडासह चार दुचाकी आणि अवजारे असा एकूण नऊ लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व त्यांच्या सहकार्‍यांनी एका गोदामावर छापा टाकून चंदन तस्कर टोळीच्या मुसक्या आवळल्या. यावेळी ३२८ किलो चंदनाची लाकडे एकत्रित आणून त्याची छाटणी करत त्यातून गाभा काढत असलेल्या सतरा जणांना पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून नऊ लाख आठ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Vasai, Death sanitation workers,
वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत
Mumbai Municipal Corporation, bmc Imposes Fines on Contractors, Fines on Contractors for Negligence in Drain Cleaning, bmc Fines on Contractors, Negligence in Drain Cleaning in Mumbai, Drainage Cleaning, marathi news, drainage cleaning news,
मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात विष्णू बांगर या मुख्य आरोपीसह अन्य सोळा जणांविरुध्द चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यात चंदन तस्करांची टोळी सक्रीय होती. रातोरात चंदनाच्या झाडाची कत्तल करुन ती सर्व लाकडे एकत्रित आणून त्यातून गाभा काढण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. या प्रकरणी स्थानिक शेतकर्‍यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने या भागातील शेतकरीही हतबल झाले होते. अखेर पोलिसांना टोळीला जेरबंद करण्यात यश आले.