आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. आज विरोधी आमदारांची संख्या कमीच होती. सुरुवातीला सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे जाणार आहेत. आमचा विश्वास बसला नव्हता. पण शिंदे गेले, त्यानंतर राष्ट्रवादी फुटणार अशी चर्चा होती. ते पण खोटं वाटलं होतं. पण अजित पवारच पक्ष घेऊन गेले. आता काँग्रेस फुटणार आहे अशी चर्चा आहे. कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही की नेमकं काय होऊ शकतं? असं अबू आझमींनी म्हटलं आहे.

भरवसा नसलेल्या राजकारणारवर काय बोलायचं?

ज्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हत्या, त्या झाल्या. काहीही भरवसा नाही त्यामुळे या राजकारणावर काय बोलायचं? असं अबू आझमी म्हणाले. त्याचप्रमाणे स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी अबू आझमी यांनी केली. सध्याच्या घडीला चित्र असं आहे की विरोधी पक्ष नेता जो जोरकसपणे विरोधकांची बाजू मांडतो तोच गेला तर मग काय करणार? विरोधी पक्षनेताच सत्तेत जाऊन बसल्यावर आता काही सांगता येणार नाही. आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे असंही अबू आझमींनी म्हटलं आहे. आमची कुणाशीही चर्चा सुरु नाही असंही आझमी यांनी म्हटलं आहे.

kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Weight loss tips for women PCOS patients, here’s a guide to safe and effective weight loss
PCOS आहे, काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा
What does the Badlapur station outbreak say after Sexual abuse of girls
बदलापूर स्थानकातला उद्रेक काय सांगतो?
What Imtiyaz Jaleel Said?
Imtiyaz Jaleel : “उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लिम मतं चालतात पण मग..”, इम्तियाज जलील यांचा सवाल
ravi rana clarification on ladki bahin
Ravi Rana : विरोधकांनी टीकेची झोड उठवताच ‘त्या’ विधानावर आमदार रवी राणा यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मी जे बोललो…”
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis,
देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसतील तर त्यांच्याशी भांडण करावे लागेल – मनोज जरांगे पाटील
Devendra Fadnavis on Budget 2024
“मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला, पण…”; परमबीर सिंह यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हे पण वाचा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा! विधानसभेत येताना केलेली ‘ही’ कृती सगळ्यांनाच भावली

समान नागरी कायद्याला विरोध

आपल्या देशात विविधेतून एकता आहे. त्यामुळे समान नागरी कायदा या देशात कसा आणता येईल? या देशात विविध धर्मांचे लोक राहतात. जर एकाच धर्माचे लोक राहात असते तर हा कायदा आणणं योग्य होतं. पण जे लोक बहुसंख्य आहेत ते अल्पसंख्य समाजाला हे दाखवू पाहात आहेत की आम्ही हे करु शकतो. मुस्लिम लोकांना आम्ही बरबाद करुन आम्ही मतं घेऊ शकतो हे त्यांना दाखवायचं आहे. जर देशात वेगळ्या धर्माचे लोक आहेत तर कायदे वेगळे असलेच पाहिजेत. सध्या २०२४ ची निवडणूक जिंकायची आहे म्हणून हे सगळं चाललं आहे असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंवर टीका

या अधिवेशनात आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणणार असं नितेश राणे म्हणाले. त्यावर विचारलं असता अबू आझमी म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर कायदा आणू असं नितेश राणे म्हणाले असते तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत केलं असतं.