विरोधकांची इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. यामध्ये चर्चा सुरु आहे की, उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष त्याकडे दिलं पाहिजे. मतदारसंघाची निवड करत लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण टीकू शकतो का? याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“आम्ही युती म्हणून भाजपाबरोबर गेलो आहोत. कोणालाही फसवलं नाही. युतीत निवडणूक लढवायची आणि स्वत:च्या मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करायची, असे आम्ही काहीही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केल्याने आमदार, खासदार सोडून गेले, पक्ष आणि चिन्ह मिळालं नाही,” अशी टीकाही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Kolkata doctor rape murder case
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टीमेटम; म्हणाल्या, “रविवारपर्यंत प्रकरण निकाली काढा, अन्यथा…”

हेही वाचा : VIDEO : “काहींना वाटतं मी म्हणजे ठाणे आहे, पण…”, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

‘आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर दीपक केसरकर यांनी सांगितलं की, “गद्दार कोणाला म्हणायचे याची व्याख्या ठरली पाहिजे. आम्ही कधी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणणार नाही, कारण त्यांच्याबद्दल आदर आहे.”

हेही वाचा : VIDEO : “काहींना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“एक विशिष्ट विचारधारा घेऊन जनतसमोर गेल्यावर ते मतदान करतात. त्याच विचारधारेबरोबर राहावे लागते. नाहीतर आपण राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवावी लागते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या आमदारांनी राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे,” असे आव्हानही दीपक केसरकर यांनी दिलं आहे.