मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जळगावच्या अमळनेरकडे निघालेली बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुखद असून अशा काळात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या कुटुंबीयांसोबत मी आहे, असा शोकसंदेश मोदी यांनी दिला आहे.

हेही वाचा >> Presidential Election 2022 Live: “राष्ट्रपती म्हणून मूर्ती नको”, तेजस्वी यादव यांनी मांडलं मत

“मध्य प्रदेशमधील धार येथी अपघाताची घटना अतिशय दुखद आहे. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रयिजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत आहे. बचावकार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासनामार्फत शक्य ती मदत केली जात आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हेही वाचा >> Presidential Election : नितीन राऊतांच्या मतदानावर बबनराव लोणीकरांचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

या अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना वाचवीण्यात यश आले आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाच्या संपर्कात आहे, अशी माहिती आपल्या संदेशात दिली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >> “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची…”; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

या घननेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले असून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित केली आहे.