लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदाच्या प्रखर उन्हाळ्यात उजनी धरणातील असलेला मृत पाणीसाठा निम्म्यावर असताना सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला भागाची पिण्याच्या पाण्याची निकड पाहून शुक्रवारी धरणातून भीमा नदीवाटे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. हे सोडलेले पाणी सोलापूरजवळील औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांमध्ये पोहोचायला दहा दिवस लागतील.

Devendra Fadnavis
शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Ajit pawar on Nilesh lanke (1)
“गडी दिसायला बारीक, पण लई..”, अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा, म्हणाले, “तुझा बंदोबस्त…”
ajit pawar
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

सकाळी ९.३० वाजता १५०० क्युसेक विसर्गाने तर दुपारी अडीच वाजता २५०० क्युसेक विसर्गाने धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता विसर्ग सहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला, असे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भोवताली आंब्यांची आरास; अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने विशेष पूजा

यंदाच्या वर्षी उजनी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती शोचनीय आहे. मागील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात ऑक्टोंबरपर्यंत ६०.६६ टक्क्यांपर्यत पाणीसाठा होणे शक्य झाले होते. परंतु त्यानंतर धरणातील पाणी वाटप नियोजन कोलमडल्यामुळे हिवाळ्यातच म्हणजेजानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठी मृत साठ्यात आला होता. धरणात ६३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा आलि तर तो मृत साठा मानला जातो. या मृत साठ्यातील पाणी शेती वा उद्योगासाठी वापरता येत नाही. तर केवळ पिण्यासाठी राखीव असते. सध्या धरणात जेमतेम वजा ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोल्याची तहान भागविण्यासाठी तीव्र निकड पाहून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणात येत्या दहा दिवसांत पाणीसाठा वजा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत खालावण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.