आज फक्त कार्यालयाचं उद्घाटन आहे तर इतकी गर्दी झाली आहे तर मग विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी होईल? विचार करा. रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी. अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरं कुठलं फडकं फडकणार? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली. तसंच मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भत ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

“देशात पहिली निवडणूक होते असा भाग नाही. पण भाजपाचं सरकार चुकून आलं तर ही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. आजपर्यंत छातीठोकपणे सांगितलं होतं की पुन्हा येईन. दिल्लीतले लोकही तेच सांगत आहेत मी पुन्हा येईन पण पुन्हा येईन स्वतःच्या घरात जातात. ते परत लोकसभा किंवा विधानसभेत येऊ शकत नाहीत. एवढाच जर पुन्हा येईनचा आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला करता? भाजपाला संकटात ज्या पक्षाने साथ दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील असं वाटत नाही. जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने खांद्यावर बसवून तु्म्हाला महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.

Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
eknath shinde reaction on manoj jarange
Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप खोटे, मराठा आरक्षणासाठी त्यांनी…”; मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
Eknath Shinde, Uddhav Thackeray,
संपूर्ण राज्यच माझे कुटुंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..
Chandrapur Bramhapuri Warora claimed by Shinde Sena
चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वरोऱ्यावर शिंदे सेनेचा दावा

सर्वपक्षीय शेठ म्हणत कुणाकडे अंगुलीनिर्देश?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं. कुठेही गेलं की आपलं दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत म्हटलं आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.”

भाजपाने जुमल्यानं नाव बदलून मोदी गॅरंटी ठेवलं

मी माझ्या भाषणात रविवारी जे बोललो ते आज पुन्हा सांगतोय दहा वर्षांत केलं काय? काँग्रेसच्या काळातल्या योजनांची नावं बदलली, स्थानकांची नावं बदलली. हे नावंही त्यांच्या नेत्यांची नावं देतात. नावं देता देता जुमल्याचंही नाव बदललं आणि मोदी गॅरंटी ठेवलं.” असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

कट्टर शिवसैनिक माझ्याबरोबरच आहेत

“एवढी फोडाफोडी केली, तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिलं. बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. याला म्हणतात निष्ठा. हे जे काही गद्दार आहेत त्या गद्दारांचा नायक आहे त्यालाही विचारा तू दाढी खाजवत जरा आठव.. कारण आपण काही आठवायचं असेल तर डोकं खाजवतो हा दाढी खाजवतो. पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसं ठेवली असतील तर माहीत नाही. पण तुम्हाला मी काय दिलं नव्हतं? शिवसेनेने देता येईल ते सगळं तुम्हाला दिलं तरीही पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आले म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.