सिनेमा, सौजन्य –
‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’, या पहिल्याच मराठी चित्रपटाची ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूट’ च्या ५७ व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. उपेक्षित समाजातल्या कुमार वयातील एका मुलाची एक तरल प्रेमकथा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे, त्याविषयी…
‘जाता जात नाही ती जात’ असा एक विचार पूर्वीपासून आपल्याकडे प्रसिद्ध आहे. जातीवर आधारित आपण तयार केलेल्या समाजरचनेमध्ये एखाद्या माणसाची किंमत, प्रतिष्ठा आणि त्याचे मूल्य तो कुठल्या जातीचा आहे यावरून ठरविली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटून गेली तरीही दुर्दैवाने आजही जातीपातीची समस्या ही आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे. जगणेच नाकारल्या गेलेल्या उपेक्षित भारतीय समाजातील लोकांच्या स्वप्नांची जी राखरांगोळी झाली, त्याची जबाबदारी ना कधी समाजाने स्वीकारली ना कधी सरकारने. स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना सातत्याने आजूबाजूला घडत असतानाच, अशाच एका उपेक्षित समाजातील कुमार वयातील मुलाची एक तरल आणि संघर्षपूर्ण प्रेमकथा लवकरच ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे नागराज मंजुळे यांनी. ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा चित्रपट-दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. कुमार वयातील मुलांची आपली स्वत:ची काही स्वप्ने असतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काहीही करायची त्यांची इच्छा असते. परंतु जेव्हा अशा स्वप्नाच्या आड आपल्या समाजातील जातीव्यवस्था येते तेव्हा उत्तुंग भरारी घेणारे मन क्षणार्धात जमिनीवर येते, जातीचा न्यूनगंड सदैव आपल्या उरात बाळगणाऱ्या त्या कोवळ्या वयातील जिवाची घालमेल सुरू होते. आजूबाजूचे जग नेमके कसे आहे याची अजून पुरेशी जाणीवही विकसित न झालेल्या या मुलाचे हळवे भावविश्व एका प्रेमकथेच्या माध्यमातून मांडण्याचा कलात्मक प्रयत्न या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी केला आहे. त्यामुळे एका अर्थाने हा चित्रपट म्हणजे, त्या मुलाचे स्वप्न आणि त्याच्या मनात असलेले अनेक न्यूनगंड यांच्यातील संघर्षांची कहाणी आहे.              
या चित्रपटाचे ‘फँड्री’ हे टायटल या चित्रपटाबद्दल आणि त्यातील आशयाबद्दल उत्सुकता निर्माण करते. ‘फँड्री’ या शब्दाचा अर्थ जरी सोपा असला तरीही सामान्य प्रेक्षकांनी आधी हा चित्रपट पाहावा आणि चित्रपट पाहिल्यानंतर मग त्याचा अर्थ आपापल्या परीने लावावा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील संदर्भ बघून याचे स्वत:पुरते अनेक अर्थ प्रेक्षकांना काढता येतील असे नागराज मंजुळे यांना वाटते. अशा संवेदनशील कथेचा चित्रपट बनवताना दिग्दर्शकाचे संवेदनशील मन सतत जागृत असणे फार गरजेचे असते. चित्रपटातील आशयाशी प्रामाणिक राहून स्वत:चा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न एक चांगला दिग्दर्शक करत असतो. या चित्रपटाच्या कथेशी स्वत:ला तू कसे काय जोडू शकलास या बाबतीत विचारले असता नागराज म्हणतो, ‘‘आपल्या प्रत्येक कथेमध्ये चित्रपट दिग्दर्शक स्वत:ला शोधत असतो, म्हणजे त्याची अभिव्यक्ती ही कुठे ना कुठे तरी त्याची स्वत:चीच एक कथा असते. लहानपणीपासूनची त्याची जडणघडण, त्याचे भावविश्व, त्याला आलेले जगण्याचे वेगवेगळे अनुभव, त्याच्या संपर्कात आलेले लोक आणि त्यांचे नातेसंबंध हे सर्व कुठे ना कुठेतरी त्याच्या कथेत नकळतपणे येत असतात. दिग्दर्शक फक्त त्या कथेला एका कलात्मक दृष्टीने आणि त्या कलेच्या प्रचलित नियमाच्या चौकटीत मांडण्याच्या प्रयत्न करतो एवढेच. ‘फँड्री’ही त्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपाची कथा असली तरीही ती कुठल्याही समाजातील नाकारलेल्या प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची कथा आहे. या कथेत मी कधी स्वत:ला, कधी माझ्या घरच्यांना तर कधी माझ्या अवतीभवतीच्या लोकांना शोधत असतो. या चित्रपटाद्वारे मी कथेशी प्रामाणिक राहून मनापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे.’’

फिल्म फेस्टिव्हल्समध्ये जाणारे चित्रपट म्हणजे अत्यंत ऑफ-बीट किंवा फक्त समांतर पद्धतीचे चित्रपट असल्याचा एक सर्वसामान्य गरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु चांगला चित्रपट हा चांगलाच असतो, मग तो फेस्टिव्हलला जाओ अथवा न जाओ.

prasad oak shared his first national award memories
“राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या चतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच अनेक नवीन तरुण दिग्दर्शकांना चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या संधी आज उपलब्ध होत आहेत हे जरी खरे असले तरीही, पठडीबाहेरचा असा एखादा विषय मांडण्यासाठी एका नवीन दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटासाठी निर्माता मिळवण्यात आजही अनेक अडचणी येतात. पण सुदैवाने आपल्याला नवलखा आर्ट्सचे नीलेश नवलखा आणि होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांच्या रूपाने चांगले निर्माते मिळाले असे नागराज आवर्जून नमूद करतो. चित्रपट नुसता बनवून उपयोग नाही तर तो प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवण्यासाठी झटणाऱ्या निर्मात्यांची आज जास्त गरज आहे असे त्याला मनापासून वाटत. नक्की काय पाहिले तुम्ही ‘फँड्री’त ? असे विचारले असता निर्माते नीलेश नवलखा म्हणाले की नागराजनी जी स्क्रिप्ट लिहिली होती त्यातील कथा ही खूप ओरिजिनल आणि खूप आतून आलेली कथा होती, त्यामुळे त्यात आम्हाला खूपच प्रामाणिकपणा दिसून आला. शिवाय एक चित्रपटकथा म्हणून त्याकडे पाहिले तर आम्हाला ती एका आंतरराष्ट्रीय स्तराची वैश्विक कथा असल्याचे जाणवले. अशा पद्धतीच्या कथा लोकांसमोर आणणे हेच आमच्या संस्थेचे प्राधान्य असल्यामुळे आम्ही कुठलाही विचार न करता हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.      
पहिल्याच चेंडूवर बॅट्समनने षट्कार ठोकावा आणि आनंदित व्हावे अशीच काहीशी अवस्था सध्या ‘फँड्री’ या चित्रपटाच्या निर्मात्यांची झालेली आहे. कारण चित्रपट पूर्ण तयार होताच, ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूटच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ५७ व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘फँड्री’ची निवड झाली आहे. यापूर्वीही कान फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या राउण्डमध्ये ‘फँड्री’ने धडक मारली होती. फिल्म फेस्टिव्हल्समध्ये जाणारे चित्रपट म्हणजे अत्यंत ऑफ-बीट किंवा फक्त समांतर पद्धतीचे चित्रपट असल्याचा एक सर्वसामान्य गरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु चांगला चित्रपट हा चांगलाच असतो, मग तो फेस्टिव्हलला जाओ अथवा न जाओ. शिवाय आता आंतरराष्ट्रीय चित्रपटांबद्दलच प्रेक्षकांचेही ध्यान वाढत असल्यामुळे परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. नीलेश नवलखा यांच्या मते, ‘‘आम्ही जगभरातल्या चित्रपटांचा थोडा अभ्यास केल्यावर असे लक्षात आलेय की, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगल्या चालतील अशा विषयाच्या मराठी फिल्म्स आपल्याकडे खूप आहेत. जर आपल्याला त्या फिल्म्सला वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये योग्य पद्धतीने विकता आले तर त्या फिल्मबद्दल भारतीय प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण होईल आणि भारतामध्ये ती फिल्म प्रदíशत करत असताना निश्चितपणे या गोष्टींचा फायदा त्या फिल्मला होईल. फँड्रीसाठी हेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत मराठी चित्रपटांनी अमराठी मार्केट कधीच शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण ऑक्टोबरमध्ये आम्ही जेव्हा लंडनला जाऊ तेव्हा यूरोपियन मार्केटमध्ये आम्ही ‘फँड्री’ कसा विकता येईल याची पाहणी करू.’’
जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांसाठी दरवर्षी रॉटरडॅम फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने रॉटरडॅम फिल्म प्रोडय़ुसर्स लॅबचे आयोजन केले जाते. या लॅबमध्ये निर्मात्यांना आपल्या चित्रपटांबद्दल जगभरातल्या इतर मान्यवरांशी बोलायची संधी मिळते. या लॅबचा उद्देश जगभरातील नवख्या निर्मात्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे आणि जगभरातील चित्रपटांबद्दल त्यांच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी मदत करणे हा असतो. या वर्षीच्या रॉटरडॅम फिल्म प्रोडय़ुसर्स लॅबमध्ये ज्या भारतीय निर्मात्यांचा सहभाग होता त्यात एक नाव नीलेश नवलखा यांचेही होते. मराठी चित्रपटांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट होती. यापूर्वी उमेश कुलकर्णी यांचे ‘देऊळ’ आणि ‘वळू’ तर सतीश मन्वर याने दिग्दíशत केलेला ‘गाभ्रीचा पाऊस’ हे चित्रपट रॉटरडॅम फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते. रॉटरडॅमच्या अनुभवाबद्दल बोलताना नवलखा म्हणतात की, ‘‘या लॅबचा मला खूपच फायदा झाला. जगभरातील इतर निर्माते चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेकडे कशा पद्धतीने बघतात हे समजावून घेता आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट निर्मिती कशी करावी आणि त्याचे योग्य मार्केटिंग कसे करावे हे खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेता आले. या सर्व अनुभवाचा परिणाम असा झाला की आम्ही ‘फँड्री’ चे हक्क चॅनेल ४ या इंग्लीश कंपनीला विकलेसुद्धा. अशा प्रकारे यापुढेसुद्धा आपल्या मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची आमची मनीषा आहे आणि त्यासाठी आम्ही आगामी काळात अजून जास्त मेहनत घेणार आहोत.’’
चित्रपटसृष्टीमधील ज्यांनी ज्यांनी ‘फँड्री’ हा चित्रपट पाहिला त्यांनी त्यांनी ह्य चित्रपटाचे कौतुक केलेले आहे. शाम बेनेगल यांनी हा चित्रपट पाहिल्यावर  ‘‘फँड्रीसारखे चित्रपट बनणे ही आजच्या काळाची गरज आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिली होती. नागराजच्या मते, ‘फँड्री’ या चित्रपटातून त्याने एक साधी कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्या अलीकडे आणि पलीकडेही काही शक्यता असू शकतात. प्रेक्षकांना त्या शक्यता दिसल्या आणि भावल्या तर ते या चित्रपटाचे खऱ्या अर्थाने यश म्हणता येईल.