छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेकदा प्रेक्षक या मालिका पाहत असताना त्यात समरसून जातात. यातलीच एक मालिका म्हणजे ‘जीव झाला येडापिसा’. कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेल्या या मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळे या मालिकेने आज इतक्या भागांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळेच मालिकेच्या सेटवर कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलं.

‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळातच शिवा आणि सिद्धी यांच्यातील वाद प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यानंतर या दोघांमधील वाद हळूहळू कमी होत त्यांच्यात प्रेमाचं नातं फुलू लागलं. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी केलेल्या या प्रेमामुळे या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला.

Wasim Akram Statement on Virat kohli Sunil Gavaskar spat over Strike rate
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Akash chopra False Statement goes viral on Rohit sharma Ex Cricketer slams with social media post
आकाश चोप्राच्या नावाने रोहित शर्माबद्दल पसरवली जात होती अफवा, माजी क्रिकेटर चांगलाच भडकला
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम

मालिकेचे ५०० भाग झाल्यामुळे सेटवर संपूर्ण टीमने या दिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. केक आणू सगळ्यांनी पार्टी केली. तसंच प्रेक्षकांचे आभारदेखील मानले. दरम्यान, सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सिद्धी लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेतील अनेक रंगतदार वळणं प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.