बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा आता पडद्यावरील वावर कमी झाला आहे. त्याचे बरेचसे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहेत. मात्र तरीदेखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. शाहरुखने ट्विटवर #AskSRK हा हॅशटॅग सुरु केला आहे. यामध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतो. या प्रश्नांमध्ये अभिनेता रितेश देशमुखने त्याला एक प्रश्न विचारला असून शाहरुखनेदेखील त्याला हजरजबाबीपणे उत्तर दिलं.

‘अबरामकडून तू कोणती गोष्ट शिकलास?’, असा प्रश्न रितेशने शाहरुखला विचारला. त्यावर शाहरुखनेही अत्यंत सुंदर उत्तर दिलं. “जेव्हा तुम्ही खूप उदास असता,खूप भूक लागली असते किंवा राग आलेला असतो. त्यावेळी मन मोकळं करण्यासाठी आपला आवडता व्हिडीओ गेम खेळता खेळता थोडंसं रडून घ्या”, असं उत्तर शाहरुखने दिलं.

आणखी वाचा : ‘परदेसी परदेसी’ गाण्यातील ‘ही’ अभिनेत्री आता काय करते?

दरम्यान, शाहरुखचं उत्तर वाचल्यानंतर अनेकांनी त्याच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं आहे. शाहरुखचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. झिरो या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्यामुळे निदान २०२० या नवीन वर्षात तरी त्याचा चित्रपट येणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.