कलाविश्वात रोजच्या घडामोडी अनेकांचेच लक्ष वेधतात. कलाकारांच्या खासगी आयुष्यात नेमके काय घडत असते हे जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांना कुतूहल असते. सध्या टेलिव्हिजन विश्वात अशाच एका सेलिब्रिटी जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगत आहेत. अभिनेता किरण करमरकर आणि अभिनेत्री रिंकू धवन हे १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होत असून, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. किरण आणि रिंकू यांच्यामध्ये बरेच वाद असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दोघेही वेगळे राहत आहेत. रिंकू आणि किरण यांचा वाद आता विकोपाला गेला असून, मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा त्या दोघांनीही सामंजस्याने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. या लोकप्रिय जोडीच्या विभक्त होण्याच्या निर्यणासोबतच आणखी एक मुद्दा आणि इतरही बऱ्याच गोष्टी कलाविश्वात चर्चेचा विषय ठरल्या.. कपिलचे सोनी टीव्हीवर ‘फिरंगी नाइट्स’ ‘मी २०० टक्के भन्साळींसोबत’ ‘इफ्फी’त राजकुमार राव आणि स्मृती इराणींमध्ये शाब्दिक चकमक ‘शाहिदचा भाऊ असल्यामुळेच ईशानवर निशाणा साधला जातोय’ युवापिढीत ‘पद्मावती’सारख्या चित्रपटांचा नायनाट करण्याची ताकद- सूरज पाल अमू पश्चिम बंगालमध्येही ‘पद्मावती’ला विरोध सलमान-कतरिना ‘स्वॅग’ने करतायेत साऱ्यांचे स्वागत VIDEO : ‘टायटॅनिक’चा रोमांच पुन्हा अनुभवण्याची संधी PHOTOS : मिस वर्ल्ड मानुषीचा बोल्ड अंदाज