छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री झाली. त्यानंतर कथेत कोणतं रंगतदार वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची माहिती खुद्द सुबोध भावेनं दिली आहे.

‘येत्या जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार आहे. मालिकाची कथा एवढीत होती. त्यात उगाच ओढून ताणून खतपाणी घालून कथा वाढवणार नाही हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे काही रंगतदार वळणांनंतर जुलैपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल’ अशी माहिती सुबोधनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

loksatta analysis effectiveness of antibiotic decreased due to inadequate use in covid 19 era
विश्लेषण : करोनानंतर अँटिबायोटिक्सची परिणामकारकता घटली? डब्ल्यूएचओच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका?
UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे

मालिकेत सुबोधने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्रीने साकारलेली इशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-इशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. आता मालिकेचा शेवट कसा करण्यात येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.