मुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही. जोपर्यंत एखाद्या साहाय्यक आयुक्तावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत अनधिकृत गोष्टींना आळा बसणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेहता त्यांच्याकडून मुंबईकरांच्या खुप अपेक्षा असल्याचे राज यांनी स्पष्ट केले