मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र धरणांतील उपलब्ध पाणी आणि राखीव साठा मिळून उपलब्ध झालेले पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये. मात्र सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून सध्या १६.४८ टक्के पाणी साठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा सर्वात कमी आहे. पुरेसा पाऊस पडेपर्यंत पुढील दोन – अडीच महिने हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह जलअभियंता विभागातील अधिकारी उपस्थित होते. पाणी कपातीची सध्या तरी आवश्यकता नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Mumbai, mobile clinic, Maharashtra Health Department , luxury vehicles, health department,
तीन कोटींच्या फिरत्या आरोग्य दवाखान्याचा वार्षिक देखभाल खर्च १३८ कोटी! ७६ फिरत्या दवाखान्यांसाठी १० वर्षात लागणार २००० कोटी
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
Monkeypox, monkeypox virus india,
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?
The dams supplying water to Mumbai are more than 98 percent full
लेख: मुंबईला पाण्याची चिंता हवी; पण कशी?
nmmc providing clean pure water to navi mumbaikars test 2000 water samples
नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध पाणीपुरवठा; पाण्याच्या दोन हजार नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट

हेही वाचा… शिष्यवृत्तीचा तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने उचलली कठोर पावले

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपात लागू करण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून ७ मे रोजी २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लिटर म्हणजचे १६.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. यापैकी केवळ १६.४८ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.

हेही वाचा… मानखुर्दमध्ये विषबाधेमुळे तरुणाचा मृत्यू, रस्त्यावर तयार केलेले बर्गर खाल्ल्यामुळे १२ जणांना विषबाधा

निवडणुकीनंतर पाणी कपात ?

सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय प्रशासन घेत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. मात्र लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेवून महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेवून आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी कपात लागू करण्याची वेळ येऊ शकते.

पाण्याचा काटकसरीने वापर करा – गगराणी

पाणीसाठ्याची उपलब्धता लक्षात घेता सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे असले तरी, वैयक्तिक स्तरावर सर्व नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये, त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे बदल स्वीकारावेत की ज्यातून पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन भूषण गगराणी यांनी केले आहे.