गेल्या काही दिवसांपासून सतत उशिराने सुरु असणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐनवेळी कर्मचारी कामावरुन घरी जाण्याच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाली असल्याने रेल्वे स्थानकावर खोळंबा होण्याची शक्यता आहे. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली असल्या कारणाने जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरुन सुरु आहे. सेवा पुर्ववत कधी होईल यासंबंधी कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.