मुंबई : नियोजन विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबवण्यासाठी १२६६ कनिष्ठ अभियंत्यांना (तांत्रिक सहायक) भरती केले आहे. नियोजन विभागाने रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मनरेगा’च्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्यसंस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर १८ मे २०२३ च्या परिपत्रकान्वये नियोजन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची सेवा ‘मे. एस.टु.इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड‘ या कंपनीची नेमणूक केली. या कंपनीने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मनरेगाच्या कामासाठी १२६६ ‘तांत्रिक सहायकां’ची भरती केली आहे. या सहायकांचे ऑगस्ट २०२३ च्या  वेतनापोटी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० इतकी रक्कम या कंपनीला देण्यात आली आहे. याची देयके सहायक लेखा अधिकारी यांनी काढली आहेत. या तांत्रिक सहायकांना महिन्यांला ४०,००० रुपये इतके वेतन ठरलेले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment of 1266 contract engineers for mnrega mumbai print news ysh