लोकसत्ता टीम

बुलढाणा : भरवेगातील वाहन अनियंत्रित होऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. यातील एकाला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
delivery boy was killed in a dispute over a raincoat Pune news
रेनकोटवरून झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या तरुणाचा खून- सिंहगड रस्ता परिसरातील घटना
Clash between group, Clash Nalasopara,
नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
can diabetics eat potatoes
उकडलेला बटाटा खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं की नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर
Due to encroachments on the drains water accumulates and creates a flood like situation Pune news
पिंपरी: नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहर तुंबले? अतिक्रमणावर लवकरच हातोडा
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
St George Hospital employee dies due to lack of timely treatment Mumbai news
वेळेत उपचार न मिळाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी नजीक आज, बुधवारी १७ एप्रिलला सायंकाळी उशिरा ही भीषण दुर्घटना घडली. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नाही. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून स्कॉर्पिओ वाहनाने जात होते. दगडवाडी नजीक भरवेगातील हे वाहन अनियंत्रित झाल्याने उलटले. यामुळे वाहन रस्त्याखाली गेले. यातील तिघेजण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

आणखी वाचा-अमरावती : ‘रोडगा पार्टी’ जीवावर बेतली; दोन तरूण तलावात बुडाले

अपघातातील मृतांची संख्या चार

देऊळगाव राजा नजीकच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे. चौघांवर देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खैरव अंबाशी येथून आठ जण जालना येथे आयोजित लग्नासाठी स्कॉर्पिओने जात होते. दगडवाडी (ता. देऊळगाव राजा) येथे भरवेगात अनियंत्रित होऊन त्यांचे वाहन उलटले. यात वसंत देशमुख (४५), अशोक भीमराव नायक (६५), विलास जयवंत देशमुख (६३) हे जागीच ठार झाले. चालक योगेश लक्ष्मण देशमुख हा अत्यावस्थ झाल्याने त्याला जालना येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. गोपाळ आबाराव देशमुख (४३), शालिनी देशमुख (३४), मीरा संजय देशमुख (४०), अक्षरा संदीप देशमुख (१९) या जखमींवर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.