बुलढाणा: अपारंपरिक कृषी पंपाना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान कुसुम योजनेला कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. यातच त्रुटींमुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रखडले असल्याचे वृत्त आहे. विद्युत व इतर पारंपरिक ऊर्जेवर आधारित कृषी पंपाना पर्याय म्हणून सौर पंप देण्याचे प्रावधान योजनेत आहे. यासाठी महाऊर्जा च्या पोर्टल वर शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

हेही वाचा >>> बुलढाणा: चार दिवस पावसाचे… हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

High Level Committee, Infectious Diseases,
संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा
Three arrested for taking bribe of Rs 50 thousand for grant approval in Pradhan Mantri Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले
Loksatta explained When will the hurdles in solar agriculture pump scheme be removed
विश्लेषण: सौर कृषीपंप योजनेतील अडथळे केव्हा दूर होणार?
Prime Minister Modi asserted that efforts should be made for global food security measures
भारतात अतिरिक्त धान्य उत्पादन; जागतिक अन्न सुरक्षेच्या उपायांसाठी प्रयत्न, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

जिल्ह्यातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या सुमारे  सहा लाख आहे. या तुलनेत कुसुम पोर्टल वर जिल्ह्यातील जेमतेम २४ हजार ९८७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मात्र आजवर केवळ २३३२ शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळाला आहे. तब्बल २ हजार५२८ अर्ज त्रुटींमुळे रखडले आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी २४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र वरील तोकडी आकडेवारी लक्षात घेता योजनेला थंड प्रतिसाद मिळाला हे स्पष्ट होते.तसेच या उपयुक्त योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार-प्रचार  करण्यात यंत्रणा कमी पडल्या असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.