पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू आहे. आतापर्यंत २०५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन प्रत्यक्ष ताब्यात आली आहे. त्यासाठी १०२१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप मोबदला म्हणून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने एकीकडे भूसंपादनाचा धडाका लावलेला असतानाच या प्रकल्पात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रखर विरोधामुळे भोर तालुक्यातील पाच गावे वगळण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

The terminal in Nigdi of PMP will be demolished for the metro station
मेट्रो स्थानकासाठी ‘पीएमपी’च्या निगडीतील ‘टर्मिनल’वर हातोडा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Thane Khadi Coastal Road Project,
ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प : प्रकल्पासाठीचे ९२ टक्के भूसंपादन पूर्ण, उर्वरित आठ टक्के भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती
cluster development project in thane
ठाण्यातील समूह विकास प्रकल्प ; समभाग, कर्जरोख्यांच्या माध्यमातून पाच हजार कोटी
Mumbai-Ahmedabad bullet train, National High Speed Rail Corporation Limited, NHSRCL, Vatrak River bridge, Gujarat, infrastructure, river bridges,
वात्रक नदीवर बुलेट ट्रेनचा पूल उभा, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दहावा नदी पूल पूर्ण
Ambazari bridge, Nagpur,
नागपूर : अंबाझरी पूल बांधणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविली, न्यायालय म्हणाले, नागरिकांची पर्वा नाही का?
41 thousand for one tree of Metro Mumbai news
‘मेट्रो’च्या एका झाडासाठी ४१ हजार खर्च
Two-Wheeler Ambulances| Integrated Tribal Development Project| Bhamragad Taluka, Technical Unsuitability|Tribal Health Crisis,
प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्याकडून शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी? धुळखात पडलेल्या दुचाकी रुग्णवाहिकेच्या…

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात करण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी ७२१ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी भोर तालुक्यातील रांजे, कुसगाव, खोपी, कांजळे, केळवडे, कांबरे आणि नायगाव ही गावे बाधीत होणार होती. या गावांतील संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील ‘रिंगरोडसाठी राखीव’ अशी नोंद रद्द करण्याची नोटीस कढण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गाला वर्तुळाकार रस्ता जोडताना शिवरे गावातील बागायती जमिनींमधून केलेल्या आखणीलाही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हे क्षेत्र वाचवण्यासाठी बोगदा करण्याची आणि पुणे-बेंगळुरूच्या नव्या आखणीत भोर तालुक्यातील खोपी ते राजापूर पांडे या पट्टयातील २२ गावे बाधीत होत आहेत. त्यामुळे ती गावेही वगळण्याची मागणी होत आहे.

भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कांबरे आणि नायगाव या गावांतील क्षेत्र वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिम भागातून वगळण्याचा निर्णय झाला आहे. या पाच गावांतील सातबारा उताऱ्यावरील वर्तुळाकार रस्त्याच्या इतर हक्कातील नोंदी रद्द करण्याचे आदेश संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत. – राजेंद्र कचरे, प्रांत, भोर