राजेश बोबडे

सेवेच्या विविधांगांविषयी व्यक्त होताना, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाषणातून सत्तालोलुपांना उद्देशून सेवेतून क्रांतीची वाट दाखवताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात- ‘देशात हीच खरीखुरी समाजक्रांतीची वेळ आहे. या काळात केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी नुसता थोरामोठय़ांचा जयघोष, दिखाऊ कामकाज किंवा पाताळयंत्री कारवाया करण्याऐवजी, प्रामाणिक जनसेवा व सार्वत्रिक लोकजागृती करणार नसाल तर तुमची सत्ता व तुमचा पुढारीपणा हवेच्या झुळकेप्रमाणे झर्रकन उडून जाईल आणि डोळे खाडकन् उघडतील, वाटेल की- काय नि कसं झालं हे! पण मग काय उपयोग? यासाठी तुम्हाला आजच इमानेइतबारे जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत. नव्या काळाबरोबर पुढे जाण्यासाठी तुमची गात्रेच जर ढिली झाली असतील तर मार्ग अडवून ठेवण्याचे तरी बंद केले पाहिजे. आमच्याशिवाय समाजाला कोण वाली आहे, म्हणून स्वत:च फुशारकी मिरवून हे रस्ते तरी का अडवून ठेवता?’ आपल्या मागील शक्तीच्या वा व्यक्तीच्या भरवशावर जगणाऱ्या सर्वानाच महाराजांचे असे स्पष्ट सांगणे आहे, मग ते गांधीभक्त असोत की अन्य पक्ष, पंथवादी असोत.

congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
The attack on Thackeray convoy was a reaction to the action Opinion of Chief Minister Eknath Shinde
ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला ही क्रियेला प्रतिक्रिया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत
sanjay raut reaction on raj thackeray attacked
Sanjay Raut : “ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पण…”; राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाराज म्हणतात, ‘महात्माजींच्या अनुयायांनाच नव्हे तर अनेक पंथांच्या, संप्रदायांच्या, जातिधर्माच्या व पक्षांच्या व्यक्तींना क्रांतिकालाकडे दृष्टी ठेवून लोकहितासाठी कार्य करण्याची मी जी विनंती करीत आहे, त्याचे कारण असे आहे की, आजचा समाज अनेक आपत्तींनी गांजला असूनही जनता आपल्याच तंद्रीत मग्न आहे. आपले पुढारीपण टिकविण्यासाठी थोरामोठय़ांची नावे उपयोगात आणीत आहे. मी प्रत्यक्ष पाहतो की आज समाजात अशांतता, अनैतिकता, अविश्वास, अत्याचार व प्रलोभनासक्ती आदी गोष्टी अशा थराला जाऊन पोहोचल्या आहेत की ज्यामुळे जग पाशवी शक्तीच्या हातूनच भस्मसात होऊन जाईल! एखादा महापुरुष आपल्या दैवी शक्तीने नि:स्वार्थी प्रचारकांकरवी जनतेचा स्वभावपालट करू शकल्यास गोष्ट वेगळी. अशा स्थितीत आमचे सर्व नेते व भक्त जर आपल्यापुरतेच पाहतील आणि उन्नतीच्या कार्यात अडथळे आणतील तर जगाच्या नाशाचे पापभागी आपसूकच ठरणार नाहीत का? सेवेतून क्रांतीची बिजे रुजवताना पुढाऱ्यांबरोबरच पूज्यपुरुषांनाही महाराज आपल्या ग्रामगीतेतून इशारा देतात-

जगांत जेवढे पूज्यपुरूष झाले।
ते सर्व सेवेनेचि गौरव पावले।
सेवा सोडतांचि राक्षस ठरले।
मारले गेले देवाकरवीं।।

rajesh772 @gmail. com