‘वार वार वारी’ हा कुमार शाहनींनी १९८७ मध्ये दिग्दर्शित केलेला कथापट अवघ्या २५ मिनिटांचा. नायिका शास्त्रज्ञ- पण स्त्री म्हणून संवेदनशील. अभिनेत्री मीता वशिष्ठ यांची पहिलीवहिली भूमिका म्हणून या चित्रपटाचे नाव घेतले जाते आणि पडद्यावर मीता यांचा वावर २० मिनिटे आहे. पण ही कुणा एका स्त्रीची गोष्ट नाहीच. धरणावर काम करणारी, त्या वेळचा संगणक सहज हाताळणारी, रेडिओबद्दल ‘हा मीच, माझ्या हातांनी जुळवून बनवलाय’ म्हणणारी नायिका खासगी स्त्री-पुरुष नात्यांच्या अबोधपणामुळे, मैत्रिणीशी दुराव्यामुळे मात्र विद्ध होते, युगानुयुगांचा मनुष्यस्वभाव काही जात नाही..  या चित्रपटाची कथा जर काही असलीच तर ती ‘भौतिक गोष्टींवर आणलेलं नियंत्रण माणसाला स्वत:वर आणता येत नाही,’ याची गोष्ट! चित्रपट हे केवळ गोष्ट सांगण्याचे माध्यम नसून प्रेक्षकांना आपापली गोष्ट रचू देण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे, हे कुमार शाहनी यांनी ओळखले, म्हणून त्यांना ‘ दिग्दर्शकांचे दिग्दर्शक’ वगैरे म्हटले गेले. अनेकांसाठी त्यांचे काम मूकपणे मार्गदर्शक ठरले. त्यांच्या निधनाने भारतीय कला-चित्रपटांच्या १९७० ते ९० या दशकांचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

‘मायदर्पण’ (१९७२) हा शाहनींचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. त्यातही स्त्री-संवेदनाच कथेच्या वाहक होत्या, पण चित्रपटाची अखेर ज्या मयूरभंज छाऊ शैलीतल्या नृत्याने होते, त्यातून या संवेदना सशक्त करू पाहाणारी स्त्री दिसली. बऱ्याच नंतरच्या ‘कसबा’ (१९९१) आणि ‘चार अध्याय’(१९९७) मध्ये पुन्हा या सशक्ततेच्या शक्यतांचा पट दिसला. स्त्रीतत्त्वाचे कोडे म्हणजे काय, याची व्याप्ती या तीन पूर्ण लांबीच्या चित्रपटांतून शोधता आली तरी त्यांना कुणी ‘त्रयी’ म्हणालेले नाही.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Gautam Gambhir abused my family Manoj Tiwary allegations on Gautam Gambhir
Manoj Tiwary : ‘त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली अन्…’, मनोज तिवारीने पुन्हा एकदा साधला गौतम गंभीरला केलं लक्ष्य
Lkoksatta samorchya bakavarun Manmohan Singh career
समोरच्या बाकावरून: ‘अपघाती’ अर्थमंत्र्याची ‘पोलादी’ कारकीर्द

‘दामोदर धर्मानंद कोसंबी, ऋत्विक घटक आणि जाल बालपोरिया’ यांची नावे आपले ‘गुरू’ म्हणून शाहनी घेत. यापैकी बालपोरिया हे ग्वाल्हेर घराण्याचे गायक. त्यांनी घराण्याच्या अभिमानाचा नव्हे तर एकंदर भारतीय कलासंचित संग्रहालयांत नव्हे तर जगण्यात टिकेल, असा संस्कार केला असणार हे शाहनींच्या चित्रपटांतील संगीत व नृत्यांवरून उमगते. ‘खयाल गाथा’ (१९८९) हा १०३ मिनिटांचा प्रयोगपट एकटे शाहनीच करू धजले, याचे कारण या तीन्ही गुरूंमध्ये शोधावे लागते. खुद्द शाहनी हे अनेकांचे गुरू ठरले. कोसंबींवर तुम्ही चित्रपट का केला नाहीत, असे विचारल्यावर ‘पण तो चरित्रपट झाला नसता.. आणि त्याहून निराळे जे करायचे ते मी करत राहिलो होतोच’ अशा अर्थाचे उत्तर देणाऱ्या शाहनींना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

Story img Loader