बदलापूर दिशेकडील अरूंद रेल्वे पादचारी पूलावरून खाली उतरत असताना तोल गेल्याने ५२ वर्षीय मुख्य तिकिट तपासनीसाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राजेंद्र प्रसाद असे मृताचे नाव आहे. प्रसाद हे २० फूट खोल खाली रूळाशेजारी पडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रसाद हे कल्याण येथे राहत होते. ते लोणावळा या मार्गावर मुख्य तिकीट तपासनीसाचे काम करत होते.