स्पर्धा परीक्षांचे निकाल लागल्यानंतर समोर येणाऱ्या संघर्षपूर्ण कहाण्या आपण ऐकतोच… पण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या मुलांचा संघर्ष लगेच संपतो का? ती कुठल्या वेदनांमधून जातात…? हे आणि असेच काही प्रश्न पुण्यातील स्वप्निलच्या आत्महत्येनं उपस्थित केले आहेत… परिस्थिती आणि स्पर्धा दोन्हींशी दोन हात केल्यानंतर यश खेचून आणणाऱ्या स्वप्निलने हे पाऊल का टाकलं? त्याच्या मनात काय सुरू होतं… याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहे…