महायुतीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारीवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. “नितीन गडकरींचे तिकीट कापून नागपूर किंवा पुण्यातून लढण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन ४० हून अधिक जागा जिंकत आहेत. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रात आणून निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.