काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी आज (३ मे) आपला उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या रायबरेलीच्या उमेदवारीवरून भाजपा नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते, त्यावेळी देशभरातील अनेक राजकीय घडामोडींबाबत त्यांनी भाष्य केले.