खरे तर वडील म्हणून अण्णांविषयी काही लिहिणे वेगळे. तसे लिहिताना स्वत:च्या अनुभवांची आणि प्रतिक्रियांची आपल्याला मदत असते. संशोधक म्हणून वडिलांविषयी लिहिण्यासाठी नुसते नाते किंवा नुसता सहवास यांचा तसा उपयोग नाही. त्याचा मोठा उपयोग व्हायचा, तो त्यांच्या कामांविषयीचा आलोक देणारा माझा व्यासंग नाही. असे असूनही मी लिहिते आहे आणि स्वजनस्तुतीचा हेतू मनात नसतानाही तशी ती घडण्याचा वा वाटण्याचा धोका पत्करून लिहिते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९३० साली अण्णांचा जन्म झाला आणि १९३५ च्या मध्यात त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हापासून १९४३ सालापर्यंतचा आठ वर्षांचा काळ अण्णांनी त्यांच्या आजोळ घरी काढला. अंदर मावळात निगडे नावाच्या लहानशा गावी त्यांचे आजोळ होते. घरात हयात माणसे दोनच. अशक्त, आजारी, ब्रह्मचारी मामा आणि दु:ख-दारिद्रय़ाच्या तळीतून भरडून निघालेली नव्वदीच्या घरातली म्हातारी आजी.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family memories about ramchandra chintaman dhere
First published on: 02-07-2016 at 02:07 IST