लग्न म्हटल्यावर शॉपिंग हा महत्त्वाचा भाग असतो. शॉपिंगमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडय़ा. गुलाबचंद यांनी खास या लग्नाच्या सीझनला साजेशा अशा साडय़ा बाजारात आणल्या आहेत. लग्न म्हटल्यावर किमान चार ते पाच दिवस कार्यक्रमांना जावं लागत असल्यामुळे प्रत्येक दिवसाला साजेशा अशाच या साडय़ा आहेत. फॅन्सी आणि एथनिक असं कॉम्बिनेशन साकार करून हे कलेक्शन बनविण्यात आलेलं आहे.