येथील राजेंद्रनगर मधील एका घरातून चोरटय़ांनी ४० हजार रूपये व एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. याबाबत फिरोज शहाजहान शेख (वय ३९) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.    
शेख यांनी घर खरेदीचा व्यवहार केला आहे. त्यासाठी त्यांनी ९० हजार रूपये जमविले होते. त्यातील ४० हजार रूपये त्यांनी तिजोरीच्या वरील बाजूस तर ५० हजार रूपये तिजोरीत ठेवले होते. सोमवारी शेख कुटुंबीय बारशाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. तिजोरीच्या वरच्या बाजूस असलेले ४० हजार रूपये व एक तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. चोरी करतेवेळी चोरटय़ांनी गल्लीतील घरांच्या कडय़ा बाहेरून लावल्या होत्या.