उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्य़ास पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला असून त्यामध्ये चार जण ठार तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
वादळात वृक्ष उन्मळून अंगावर पडल्याने गुलाबी (५५), आनंद (१०) आणि दासवतिया (५७) हे तीन जण मणियार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठार झाले तर सुदामा (७०) हे सुखपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
पाऊस आणि वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि दळणवळणही कोसळले त्याचप्रमाणे वाहतुकीवरही परिणाम झाला.