IPL 2024 Points Table: आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा ५१ धावांनी सहज पराभव केला. या पराभवासह केकेआरने तब्बल १२ वर्षांनी वानखेडेच्या मैदानात मुंबईवर मोठा विजय मिळवला. केकेआरने मागे पडल्यानंतरही सामन्यात चांगले पुनरागमन केले, तर घरच्या मैदानावर खेळत असूनही मुंबईने पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केले आहे. संपूर्ण षटकेही न खेळता मुंबईचा संघ १६९ धावांच्या लक्ष्यासमोर १४५ धावा करत सर्वबाद झाला. आता या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफ गाठणार का जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, केकेआर संघाची सुरुवात खूपच खराब झाली, ज्यामध्ये त्यांनी ७ धावांवर फिल सॉल्टच्या रूपात त्यांची पहिली विकेट गमावली. तर संघाचे टॉप-५ फलंदाजही जास्त वेळ टिकू शकले नाहीतय अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, सुनील नरेन आणि रिंकू सिंग यांनीही विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारणे कठीण वाटत होते. पण व्यंकटेश अय्यर (७०) आणि मनिष पांडेच्या (४२) भागीदारीच्या जोरावर केकेआऱ १६९ धावांचा आकडा गाठला.

Mumbai Indians Can Reach Playoff of IPL 2024 Point Table
मुंबई इंडियन्स ७ सामने हरूनही गाठणार प्ले ऑफ! ४ सामन्यांमध्ये ‘असं’ जुळावं लागेल गणित, कसं आहे पॉईंट टेबल?
Ishan Kishan reprimanded, Ishan Kishan fined for breaching IPL Code of conduct
DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इशान किशनवर दंडात्मक कारवाई, वाचा काय आहे कारण?
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Hardik Pandya Statement on MI defeat to KKR
IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
What Is BCCI's New Toss Rule
BCCI चा मोठा निर्णय! आता सामन्यापूर्वी नसणार नाणेफेकीची गरज, प्रथम फलंदाजी की गोलंदाजी करणार? जाणून घ्या

मुंबईचीही सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सूर्याच्या ५६ धावांच्या तुफान खेळीनेसुध्दा मुंबईला पराभवापासून वाचवले नाही. यासह मुंबईचा संघ ११ सामन्यातील ८ पराभवांसह सहा गुण मिळवत आयपीएल २०२४ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आता मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जर तर आणि गणितीय समीकरणांचा आधार आहे.

मुंबई इंडियन्सचे अजून तीन सामने बाकी आहेत, या तिन्ही सामन्यात मुंबईने जर विजय मिळवला तरी संघ फार फार तर १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यातही मुंबईचा संघ नेट रन रेटमध्येही मागे आहे. मुंबईला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थान आणि कोलकाताचा संघ सर्वाधिक गुणांसह पहिल्या दोन स्थानी आहे.