केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्री वादग्रस्त प्रश्नांवर करीत असलेले भाष्य आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या गटांकडून होणारा धर्मातराचा प्रचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
‘घरवापसी’सारख्या कार्यक्रमांचा प्रचार करून आपण परदेशी गुंतवणूक नाकारत आहोत हे मंत्र्यांना कळत नाही त्याची जाणीव मोदी यांनी करून घ्यावयास हवी, परदेशी गुंतवणूकदार येत नाही याची त्यांना जाणीवच नाही. मोदी यांना जाणीव झाली तरच ते निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू शकतील, असेही थरूर म्हणाले.जयपूर साहित्य महोत्सवात थरूर एका चर्चेत बोलत होते. स्वच्छ भारत मोहिमेला कितपत यश मिळेल याबद्दलही थरूर यांनी शंका व्यक्त  केली.