मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
विरोधी पक्ष हा सत्ता काबीज करण्यासाठी टपून बसला आहे. त्यामुळे लोकमतावर प्रभाव पाडण्यासाठी पसरवलेल्या चुकीच्या माहितीबाबत आग्रही भूमिका घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉंग्रेसच्या एक दिवसाच्या चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे अठरा महिने शिल्लक असताना, दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी पक्षाने भरपूर मेहनत घेतली पाहिजे असं सोनिया गांधी म्हणाल्या. आजच्या बैठकीला कॉंग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेत्यांसह पंतप्रधान मनमोहन सिंग हेसुध्दा उपस्थित आहेत.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांत सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतले आहेत. मात्र, आपल्याला सध्या फार कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. तरिही आपण जनतेलं दिलेलं वचन पाळणं हा आपला धर्म आहे.
अनेक योजना आणि कायद्यांद्वारे सरकारने देशाचा चेहरा बदलला आह, असं त्या म्हणाल्या.
आजच्या बैठकीला राहुल गांधीसुध्दा उपस्थित आहेत. पक्ष आणि सरकार यांच्यामधील चर्चा बैठकीपुरती मर्यादित राहता कामा नये असं पहिल्यांदाच पक्षाध्यक्षांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांना सुनावले.




















जर गेल्या आठ वर्षांत सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय युपीये सरकारने घेतले आहेत तर त्या सरकारला सध्या फार कठीण प्रसंगांचा सामना का करावा लागत आहे?. भ्रष्टाचार, भ्रष्ट व्यवस्था का निर्माण झाली? गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे मुष्किल झाले आहे. लोकशाहीचे खासगी विरासतीत परिवर्तन केले आहे. घराणे शाहीचे सर्व काँग्रेसवाले मांडलिक बनले आहेत. काळा पैसा सफेत करण्यासाठी एफ्डीआय भारतीयांच्या माथी मारलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा लिलाव होत आहे. या सर्व कुकर्माला कोणते सडेतोड उत्तर आहे?
“आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले”
म्हणजे अठरा महिन्यात जेवढे खाता येइल तेवढे खौउन घ्या.