लॉकडाऊन काळात असंख्य ग्राहकांनी मोबाईल, वीजबिल किंवा इतर बिलं भरण्यासाठी ऑनलाईन बँकिंगचा पर्याय निवडला. अनेक ग्राहक Gpay, Phonepay अशा Online Payment पर्यायांचा वापर करू लागले. तर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी Auto-debit Payment या पर्यायाचा देखील वापर केला आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात सुमारे २ हजार कोटी रुपयांची सेवांबाबतची बिलं ही ऑटो डेबिट पेमेंड सुविधेच्या माध्यमातून चुकती केली जातात. पण आता ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. आणि फार लांब नाही, तर १ एप्रिलपासूनच ही सुविधा बंद होऊ शकते. द न्यूज मिनटने दिलेल्या वृत्तानुसार IAMAI अर्थात Internet And Mobile Association of India या सेवापुरवठादारांच्या संघटनेने तसा इशारा दिला असून देशातल्या अनेक बँकांना त्यासाठी कारणीभूत ठरवलं आहे.

काय आहे Auto-Debit Payment?

breast cancer among young women marathi news
तरुण महिलांमधील स्तनाच्या कर्करोगात वाढ! नियमित तपासणी करण्याचे डॉक्टरांचे आवाहन…
Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
April electricity bill may go up by ten percent
वीज दरवाढीचे चटके कमी करण्याचा विचारच नाही?

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या सेवा वापरत असतो. त्यांची बिलं वेळेवर भरली गेली नाहीत, तर संबंधित सेवा खंडित होऊ शकते. मग त्यात विजबिलांपासून ते Amazon, NetFlix सारखे OTT प्लॅटफॉर्म्सपर्यंत अनेक सेवांचा समावेश येतो. त्यामुळे अशा वेळी Online Payment चा एक भाग असलेली ऑटो डेबिट पेमेंटची सुविधा बँकांकडून दिली जाते. याचा अर्थ संबंधित सेवेची माहिती आपण बँकांनि पुरवलेल्या ठिकाणी भरली, की दर महिन्याला तयार होणारं बिल आपोआप आपल्या खात्यामधून भरलं जाणार. म्हणजे तेवढी रक्कम आपल्या खात्यातून वजा होणार. त्यामुळे बिल भरण्यास विसरल्यामुळे संबंधित सेवा खंडित होण्याची पाळी आपल्यावर येत नाही.

मग आताच अचानक काय झालं?

आत्तापर्यंत ही सेवा अगदी सुखेनैव सुरू होती. पण आता इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं बँकांची तक्रार केली आहे. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घालून दिलेल्या नियमांचं पालन बँकांकडून केलं जात नसल्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा इशारा आयएमएआयनं दिला आहे. यामध्ये थेट बँक खात्यातून किंवा एटीएम कार्डमधून अदा केल्या जाणाऱ्या बिलांचा देखील समावेश आहे.

काय आहेत हे नवे नियम?

१. पेमेंटच्या तारखेपासून ५ दिवस आधी बँकांनी ग्राहकांना त्यासंदर्भात विचारणा करणारी माहिती द्यावी आणि ग्राहकांच्या परवानगीनंतरच खात्यातून पैसे वर्ग करावेत.

२. ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिलं अदा करताना परवानगीसाठी बँकांनी ग्राहकांना वन टाईम पासवर्ड पाठवावा.

यासाठी आवश्यक प्रणाली तयार करण्यासाठी बँकांना ३१ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही बँकांनी त्यावर कार्यवाही केली नसल्यामुळे त्याचा फटका लाखो ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वैयक्तिक ग्राहक आणि कंपन्यांचा देखील समावेश आहे. या परिस्थितीमध्ये अनेक सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना पेमेंट करण्याचे इतर मार्ग सुचवायला सुरुवात केली आहे.

BHIM UPI द्वारे पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतोय? इथे करा तक्रार

काय आहे पर्याय?

जर बँकांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवठादाराच्या वेबसाईटवर किंवा इतर पेमेंट संकेतस्थळांवर जाऊन पेमेंट करावं लागणार आहे.