घरगुती कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने ५१ जणांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तेलंगाणातील आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवटपासून ७ कि.मी. अंतरावर मांडवा (निमगुडा) या गावात राहणाऱ्या राम कुमरे यांच्या घरी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नातवाच्या पाचवीच्या कार्यक्रमानिमित्त राम कुमरे यांनी नातेवाईक, आप्तेष्टांना भोजनासाठी बोलावले होते. २३ ऑक्टोबर रोजी तयार केलेले जेवण नातेवाईकांनी खाल्ले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर रात्री अचानक सगळ्यांनाच पोटदुखी, उलटी व शौचाचा त्रास सुरू झाला. गावातील काही नागरिकांच्या मदतीने विषबाधा झालेल्यांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यापकी ओमेश्वर शामराव घोडाम (वय ६), वनश्री सिडाम (वय ४), वनिता घोडाम (वय ४२) व समीक्षा कोते (वय ६) यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना आदिलाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर आमदार प्रदीप नाईक, तहसीलदार शिवाजी राठोड, माजी आमदार भीमराव केराम, जिल्हा परिषदेचे प्रकाश राठोड, आदींनी रुग्णालयात धाव घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2015 रोजी प्रकाशित
शिळे अन्न खाल्ल्याने ५१ जणांना विषबाधा
घरगुती कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने ५१ जणांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Written by दया ठोंबरे
First published on: 26-10-2015 at 01:53 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food poison 51 persons