अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीतील स्त्रिया-मुलांना निवारागृहांचा आसरा घ्यावा लागतो. वेळोवेळी विविध कायद्याने निवासी सदने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनावर सोपविली आहे. परंतु निवासी संस्थांची गरज असलेल्या समाजघटकांची संख्या लक्षात घेता हे प्रयत्न अगदीच तोकडे आहेत ही बाब नेहमीच समोर आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आश्रमशाळेतील मुलींवरील अत्याचाराचे भीषण प्रकार पुन्हा नव्याने आपल्यासमोर उघडकीस येत आहेत. अशा निवासी संस्थांच्या गलथान कारभाराचा संस्थेबाहेरील व्यक्तींनी गैरफायदा घेणेच नाही तर संस्थेतील कर्मचारीवर्गही बाहेरील लोकांशी हातमिळवणी करतो, कर्मचारी वर्गातील काही जण प्रसंगी स्वत: अत्याचारी बनतात, केव्हा केव्हा त्यातील निवासींपैकी वयाने थोडे मोठे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा लहान मुलांवर अत्याचार करतात. एक ना अनेक पद्धतीचे अत्याचार आणि गैरव्यवहार अशा अनेक संस्थांमध्ये चालतात. शासनातर्फे विशेष समित्या नेमल्या जातात, यथावकाश या प्रसंगांची चौकशी केली जाते, काही प्रमाणात गुन्हेगारांवर कारवाई होते, अत्याचारी व्यक्ती राजकीय किंवा आर्थिक बाजूने भक्कम असेल तर तो निर्दोष सुटतोही. मग प्रश्न असा उरतो की, या संस्थांची अशी दयनीय अवस्था असूनही अशा संस्था चालवल्याच का जातात?

मराठीतील सर्व कायद्याचा न्याय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residential institutions limit
First published on: 19-11-2016 at 05:16 IST