पहिल्या लग्नाच्या वेळी झालं तेच पुनर्विवाहातही होणार ही भीती आणि जुन्याशी तुलना हे पुनर्विवाहातले मोठे अडथळे असतात. भूतकाळात अडकून अपराधी भाव बाळगला तर पुढचंही आयुष्य त्या सावलीत जाऊ शकतं. भीतीपेक्षा त्या अनुभवातून मिळालेली परिपक्वता, भान घ्यायचं. दुसऱ्याची बाजू समजून घेऊन, स्वत:च्या अपेक्षांकडे त्रयस्थपणे पाहायला शिकायचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘माझं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं, गेल्या वर्षी आम्ही विभक्त झालो. आता पुन्हा लग्न ठरतंय, त्याचाही पुनर्विवाहच असल्यामुळे आमचं जमेल असंही वाटतं आणि पुन्हा पहिल्या लग्नासारखंच होईल अशी भीतीही वाटते. घरच्यांच्या कॉमेंट्सचा कधी राग येतो, कधी माझंच चुकलं असं अपराधीही वाटतं. सतत उलटसुलट तेच विचार आणि घरातल्या त्याच त्या चर्चेनं गोंधळायला होतं. आत्मविश्वासच संपतोय. तटस्थपणे काही सांगाल म्हणून तुमच्याकडे आले.’’ हसरी, स्मार्ट, पण डोळ्यांत एक उदास, असुरक्षित छटा असणारी प्राची सांगत होती.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before second marriage
First published on: 26-11-2016 at 00:57 IST