बिहार विधानसभेची निवडणूक ही राज्यातील ‘जंगल राज’ आणि ‘विकास राज’ यांच्यातच होणार आहे. बिहारी जनतेच्या भल्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांनी (रालोआ) सकारात्मक कार्यक्रमांचा झेंडा हाती घेतला आहे; याउलट राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्या सभांमधून नकारात्मक बाष्कळ प्रचारावर भर देत आहेत, अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांनी मंगळवारी केली.
येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, बिहारच्या विकासासाठी भाजपने आराखडा तयार केला आहे. त्याविरुद्ध सेक्युलरवादी पक्ष नकारात्मक प्रचार करीत आहेत.