दहशतवाद आणि सीमेवरील कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिल्याचा इतिहास आहे. दोन्हीकडच्या सरकारांच्या कामगिरीप्रमाणेच जनता, राहणीमान, आर्थिक विकास, रोजगार, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर अनेकदा दोन्ही देशांची तुलना केली जाते. भारताकडून अनेकदा हे मुद्दे पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, आता चक्क पाकिस्तानच्याच एका खासदारानं पाकिस्तान सरकारला देशाच्या संसदेतच भारताचं नाव घेऊन सुनावलं आहे!

पाकिस्तानच्या संसदेत नेमकं काय घडलं?

पाकिस्तानच्या संसदेमध्ये देशाच्या विकासाबाबत चाललेल्या चर्चेदरम्यान विरोधी बाकांवर बसलेल्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. जमैत उलेमा-ए-इस्लाम फज्ल पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रेहमान यांनी सोमवारी सत्ताधाऱ्यांवर संसदेत टीका केली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला मोर्चा काढण्यासाठी सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावरून त्यांनी सरकारला सुनावलं.

bangladesh interim govt head muhammad yunus assured safety security of hindus
Muhammad Yunus on Hindu Safety : मोहम्मद युनूस यांच्याकडून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
bangladesh political crisis
Muhammad Yunus : ठरलं! नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस होणार बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख
bangladesh political crisis
Bangladesh Political Crisis : बांगलादेशमधील परिस्थितीबाबत अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय…”

“रॅली काढणं हा पीटीआयचा अधिकार आहे. असद कैसर यांची रॅली काढण्याची मागणी रास्त आहे आणि सरकारनं त्यांना रॅली काढण्यासाठी परवानगी दिली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना रेहमान यांनी थेट भारतातील परिस्थितीशी पाकिस्तानची तुलना केली.

भारत-पाकिस्तान तुलना

“आपण फक्त आपली भारताशी तुलना करून पाहायला हवं. भारत आणि आपण एकाच दिवशी स्वतंत्र झालो. १५ ऑगस्ट १९४७ ला सकाळी ८ वाजता दिल्लीत लॉर्ड माऊंटबॅटननं भारताच्या गव्हर्नर जनरलपदाची जबाबदारी स्वीकारली आणि कराचीत मोहम्मद अली जिनांनी जबाबदारी स्वीकारली. एकाच दिवशी आपण स्वतंत्र झालो. पण आज ते महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि आपण दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी भीक मागतोय”, असं रेहमान म्हणाले.

“गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘रॉ’नं रचला”, वॉशिंग्टन पोस्टन दिलं वृत्त; भारतानं परखड शब्दांत सुनावलं!

“पाकिस्तान इस्लाम राष्ट्र कसं होणार?”

दरम्यान, पाकिस्तान दिवसेंदिवस धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ लागल्याबाबत रेहमान यांनी चिंता व्यक्त केली. “आपल्याला मुस्लीम धर्माच्या नावावर हा देश मिळाला. पण आपण आज धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनलो आहोत. १९७३ सालापासून कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडिओलॉजीच्या एकाही शिफारशीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आपण मुस्लीम राष्ट्र कसं होणार?” असा प्रश्न रेहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत विचारला आहे.