नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या मॅचफिक्सिंगच्या आरोपामुळे भाजप संतप्त झाला आहे. भाजपने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवत राहुल गांधींना फक्त नोटीस बजावू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

bangladesh interim govt head muhammad yunus assured safety security of hindus
Muhammad Yunus on Hindu Safety : मोहम्मद युनूस यांच्याकडून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Gadchiroli, Atrocity, IAS Shubham Gupta,
गडचिरोली : आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा….
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Malegaon, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Ajit Pawar met Aasif Shaikh, Jan samman Yatra, Asif Shaikh, Sharad Pawar group, Congress, Sheikh family, defections, conciliatory relationship, BJP alliance, Malegaon Central Constituency, independent elections, Maha vikas Aghadi
अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी
Uddhav Thackeray, MNS attack, MNS attack on Uddhav Thackeray convoy, Maharashtra Navnirman sena, convoy, Thane, coconut attack, Avinash Jadhav, police case, political tensions,
अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर गुन्हा

इंडियाच्या घटक पक्षनेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी भाजप व मोदींवर ताशेरे ओढले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलले जाईल, असे भाजपच्या नेत्याने म्हटल्याचा दाखला राहुल गांधींनी दिला होता. तसेच, मतदानयंत्रांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला होता. राहुल गांधी यांनी सभेतील भाषणातून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल यांची विधाने आक्षेपार्ह व गंभीर परिणाम करणारी आहेत. संविधान बदलण्याची भाषा भाजपच्या कार्यकर्त्यांने केलेली नाही. मतदान यंत्रांमध्ये फेराफेरीचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. तरीही राहुल गांधी सातत्याने गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी केला. पुरी यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक शिवीगाळ करणे, हा बहुसंख्य काँग्रेस व इतर विरोधी नेत्यांचा खेळ झाला आहे. मोदी लोकसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंग करत असल्याचा आरोप बिनबुडाचे असून पुराव्याशिवाय आरोप करणे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई झाली पाहिजे, अशी तक्रार भाजपने केली आहे.